अष्टक वर्ग म्हणजे काय?

हे अष्टक वर्ग काय आहे  ते का शिकायचे ते आपण पाहू.

ज्योतिष शास्त्र शिकायचे म्हटले की प्रथम पारंपरिक वैदिक ज्योतिष शास्त्र आपण शिकतो. हा बेस पक्का झाला की आपण सोबत अष्टकवर्ग शिकावे म्हणजे आपण अचूक फलादेश करू शकतो आपले फलादेश  95ते 97% बरोबर येतील.

अष्टक म्हणजे आठ, त्याच्या नावातच आहे. असे आठ वर्ग उर्फ टेबल असतात.

आपल्याला वैदिक ज्योतिष शास्त्र चांगले माहिती आहे. पण ते थोडे क्लिष्ट आहे. म्हणजे आपण लग्न कुंडली बघतो, तसेच नवमंश पण बघतो. त्यानंतर चंद्र कुंडली, चलित कुंडली, शोडष वर्ग कुंडल्या तसेच ग्रह उच्च, नीच, दृष्टी, योग, युती वगैरे वगैरे.. एवढे करुन पण कधी कधी confusion होते काय नक्की सांगावे…

डिग्री, दशा वगैरे…

असाच प्रश्न पाराशर ऋषीं यांचे शिष्य मैत्रेय याने प्रश्न विचारला, गुरुदेव अजून एखादी सोपी पद्धत आहे का…

व यावरूनच अष्टक वर्ग निर्माण झाले.

पाराशर ऋषींनी संस्कृत मधे याचे श्लोक लिहिले आहेत.

त्यांनी सात ग्रह व लग्न असे मिळून आठ कोष्टक, टेबलं तयार केले.

त्यांनी लिहून ठेवले आहे, की फक्त एका ग्रहाचा परिणाम होत नाही तर बाकी ग्रह सुद्धा कारणीभूत असतात. त्यानुसार त्यांनी

सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि या सर्वांचे भिन्नष्टक तयार केले व त्यानंतर सर्वाष्टक तयार केले.

त्यांनी प्रत्येक ग्रह आपल्या स्थाना पासून दुसऱ्या कुठल्या कुठल्या स्थानाना शुभ बिंदू  देईल हे सर्व लिहून ठेवले आहे.

सूर्याला 48 बिंदू दिले आहेत

चंद्र 49

मंगळ 39

बुध 54

गुरु 56

शुक्र 52

शनि 39 बिंदू देतो.

टोटलं 337 बिंदू. याला 12 भाव यांनी भागाकार केला की 28 बिंदू येते. व हेच average धरले आहे.

तसेच प्रत्येक ग्रह 0 ते 8 बिंदू देतो. याचे average 4 आहे.

आता 28 पेक्षा कमी की जास्त हे बघावे व त्यामधील प्रत्येक ग्रहने किती बिंदू दिले तेच बघावे. प्रत्येक ग्रह max 8 बिंदू देतो.

त्यामध्ये 4 हा बेस आहे. 4 पेक्षा कमी म्हणजे अपेक्षित फळ मिळणार नाही . व 4 पेक्षा जास्त असतील तर चांगले फळ मिळेल.

अष्टक वर्गात बिंदू किती आहेत त्याचा अभ्यास करायचा, कुठल्या भावात कुठला ग्रह व त्याचे बिंदू किती.प्रत्येक ग्रहाचे भिन्नष्टक असते व तेच टोटल करुन अष्टक वर्ग तयार होतो.

असे म्हटले जाते की त्रिक स्थान 6,8,12 यांना कमी बिंदू असतील तर चांगले असते. हे केस to केस बदलू शकते.

लग्न स्थानापेक्षा षष्ठ स्थान, अष्टम स्थान, व व्यय स्थान यांना कमी बिंदू असतील तर चांगले असते. संघर्ष कमी. समजा षष्ठ व अष्टम स्थानाला लग्न स्थाना पेक्षा जास्त बिंदू असतील तर जास्त संघर्ष करावा लागतो.  कर्ज आजार, प्रॉपर्टी,गुप्त शत्रू या पासून त्रास होतो.

पण अगदीच हा नियम 100 % नाही, कारण षष्ठ स्थान स्ट्रॉंग असेल तर बॉस, हाता खालील कामगार यांचे चांगले सहकार्य मिळते. शनी, मंगळ चांगले बिंदू असतील तर गुप्त शत्रू पासून संरक्षण करतो. गुरु, शुक्र चांगले बिंदू असतील तर कर्ज फिटते. बुधाला चांगले बिंदू असतील तर मावशी, मामा यांच्याशी चांगले संबंध असतात.

अष्टम स्थानाला चांगले बिंदू म्हणजे अचानक धनलाभ. प्रॉपर्टी पासून फायदा. असे होऊ शकते. सासुरवाडी कडून फायदा होऊ शकतो. जोडीदाराकडून फायदा होतो. नोकरीं करणारी पत्नी मिळते.

व्यय स्थानाला जास्त बिंदू असतील तर खर्च जास्त. परदेश गमन योग. बंधन योग. दवाखाना हे पण बघता येते. पण ही स्थाने नेहमीच वाईट फळे देतील असे नाही. कुठले ग्रह आहेत त्यावर ते अवलंबून आहे. राहू असेल तर अडचणीत आणतो, बंधन योग म्हणजे तुरुंगात जाण्याची वेळ येते.

असे प्रत्येक भावा विषयी आपण बघू शकतो व त्यावरून चांगले prediction करू शकतो.

लग्न स्थान बलवान असेल, चांगले बिंदू असतील तर ती व्यक्ती निरोगी, आत्मविश्वास भरपूर अशी असते. ती व्यक्ती जे ठरवेल ते करते.

द्वितीय स्थान / कुटुंब स्थान – चांगले बिंदू असतील तर धन संचय चांगला असतो. बँक बॅलन्स चांगला. कौटुंबिक सुख चांगले. कुठल्या ग्रहने किती बिंदू दिले त्यावरून आपण सांगू शकतो.

तृतीय स्थान – पराक्रम स्थान : व्यक्तीचा पराक्रम म्हणजे मेहनत किती करतो, जवळचे प्रवास हे बघू शकतो. भावंड, त्यांचे संबंध बघू शकतो. विसा, कागद पत्र, हे बघू शकतो 

चतुर्थ स्थान – सुख स्थान. उत्तर आयुष्य कसे जाईल ते पाहू शकतो. मातृ स्थान, आईशी संबंध, बॉण्डिंग आहे का. मातृ सुख. हे पाहतो.

भौतिक सुख, स्वतःचे घर, वाहन ही सुख आहेत का, हे बघू शकतो. प्राथमिक शिक्षण हे पण बघू शकतो.

पंचम स्थान – शिक्षण, प्रणय, संतती,  लॉटरी सट्टा, शेयर बाजार या विषयी बघू शकतो. कुठल्या ग्रहने किती बिंदू दिले त्यावरून सांगू शकतो. हे कला, आर्ट, drawing, acting, music, डान्स, क्रीडा स्थान पण आहे. प्रेम विवाह होईल का हे बघू शकतो  व्यक्तीचा कल कुठे आहे हे सांगू शकतो.

सप्तम स्थान – विवाह स्थान, पार्टनर शिप. विवाह सुख, जोडीदार कसा असेल, वैवाहिक सुख आहे का. स्वतःचा व्यवसाय चालेल का. हे बघू शकतो. मंगळ, शुक्र, गुरु किती बिंदू आहेत…

नवम स्थान – भाग्य स्थान, वडिलांशी संबंध, परदेश गमन योग, तीर्थ यात्रा, उच्च शिक्षण हे बघू शकतो. किती बिंदू आहेत.

दशम स्थान – कर्म स्थान. लोकप्रियता. मेहनत. नौकरी की व्यवसाय..हे बघू शकतो.

लाभ स्थान – सर्व प्रकारचे लाभ, इच्छा पूर्ती. चांगला मित्र हे पाहू शकतो.

लाभ स्थानाला कर्म स्थाना पेक्षा जास्त बिंदू असतील तर चांगले. कर्म स्थानाला 30 बिंदू असतील व भाग्य स्थानाला 32,34,36 बिंदू असतील तर खूप छान. व्यय स्थानाला लाभ स्थाना पेक्षा कमी बिंदू असतील तर चांगले.

असे प्रत्येक भावा विषयी आपण बघू शकतो व त्यावरून चांगले फलादेश करू शकतो.

3,6,10,11 यांना 30 पेक्षा अधिक बिंदू असतील तर व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने कमवतो व त्याचा लाभ घेतो. याला उपचंय स्थान म्हणतात.

सर्वाष्टक बिंदुंच्या आधारे फलादेश करताना सर्व साधरण पणे पुढील निकषांचा विचार केला जातो

1. २६ ते ३० ह्या रेंज मध्ये सर्वाष्टक बिंदू असतील तर त्याचा फलादेश सर्वसाधारण शुभ असा मानला जातो

2. सर्वाष्टक बिंदू ३१ पेक्ष्या जितके अधिक असतील तितके त्या स्थानासाठी शुभ फलदायी .

3. सर्वाष्टक बिंदू २५ पेक्षा जितके कमी असतील तितके त्या स्थानासाठी अपेक्षित फळ मिळत नाही.

4. द्वितीय स्थानाचे बिंदू व्यय स्थानापेक्षा अधिक असल्यास जातक पैसा राखून असतो .

5. दहाव्या स्थानापेक्षा अकराव्या स्थानास अधिक गुण असतील आणि व्यय स्थानास अकराव्या स्थानापेक्षा कमी  गुण असतील तर जातकाला त्याच्या कामकाजात समाधानकारक धन  प्राप्ती होते आणि मर्यादित व्यय असल्याने पैसा शिल्लक राहतो या  उलट दहाव्या स्थानात अकराव्या स्थानापेक्षा अधिक बिंदू असतील तर जातकाला त्याच्या मेहनतीच्या तुलनेने कमी प्राप्ती होते आणि जातकात असमाधानकारक वृत्ती निर्माण होते .

6. १.४.५ .७.९.१० ह्या स्थानातील बिंदूंची बेरीज २,३,६,८,११,१२, ह्या स्थानातील बिन्दुन्पेक्षा अधिक असेल तर जातक आयुष्यात जास्त सुखी असतो  उलट असेल तर संघर्ष करावा लागतो.

7. पत्रिकेचे धर्म, अर्थ, काम, मोक्ष त्रिकोण असे चार भाग करावेत .प्रत्येक त्रीकोणाने दर्शविलेल्या तीन स्थानांची सर्वाष्टक बिंदूची बेरीज करावी , जर धर्म त्रिकोणाची (१,५,९ ) ची बेरीज सर्वात जास्त आली तर जातक धनवान असतो आणि सत्कर्म , दान ,धर्म ह्या बाबींवर पैसा खर्च करतो .जर अर्थ त्रिकोणाची बेरीज (२,६,१० ) सर्वाधिक असेल तर जातक नोकरी करून पैसा कमवीत असतो . जर मोक्ष त्रिकोणाची (४,८,१२ ) बेरीज सर्वाधिक  असेल तर जातकाची आर्थिक स्थिती बेताची असते ,कर्जबाजारी होण्याची शक्यता असते .

8. वरील स्थाने दिशादर्शक पण आहेत. राशी प्रमाणे : १,५,९ पूर्व दिशा ,२,६,१० दक्षिण दिशा ,३,७,११ पश्चिम दिशा आणि ४,८,१२ उत्तर दिशा .ज्या दिशेची बेरीज जास्त असेल ती   दिशा जातकास त्याच्या जन्म् स्थानापासून शुभ असेल .

9. पत्रिकेचे १ ते ४ स्थान , ५ ते ८ स्थान , ९ ते १२ स्थान असे तीन भाग करावेत पहिला भाग आयुष्याचा पूर्वार्ध ,दुसरा भाग आयुष्यातील मध्य कालखंड ,  आणि तिसरा भाग म्हणजे आयुष्यातील उत्तरार्ध ,ज्या भागातील सर्वाशात्क गुणांची बेरीज सर्वाधिक असेल त्याप्रमाणे येणारा कालखंड सर्व दृष्टीने उत्तम असेल ,या उलट ज्या  भागातील बेरीज कमी असेल तो कालखंड त्रासदायक असेल असे म्हणता येईल .

10. पत्रिकेतील लगतच्या कोणत्याही दोन स्थानातील फरक २५ टक्यापेक्षा जास्त नसावा ,ज्या स्थ्नांमध्ये असा फरक दिसेल तितक्या प्रमाणात जातकाच्या जीवनात वरचेवर चढ उतार होऊन जीवन अस्थिर राहील .          

11   3,6,10,11 यांना 30 पेक्षा अधिक बिंदू असतील तर व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने  कमवतो व त्याचा लाभ घेतो. याला उपचंय स्थान म्हणतात.

वरील प्रकारे जातकाच्या पत्रिकेत कोणते तत्व —- अग्नी ,पृथ्वी ,वायू ,जल प्रभावी आहे आणि कोणते  कमकुवत आहे ते  पाहावे ,जातकाचा स्वभाव कश्या प्रकारचा आहे हे समजण्यासाठी चर ,स्थिर आणि  द्विस्वभाव राशीतील सर्वाष्टक बिंदूंची बेरीज करावी आणि त्या प्रमाणे जातकाच्या स्वभावाबद्दल निष्कर्ष काढावा .जातकाच्या प्रकृती बद्दल अनुमान काढण्यासाठी वात पित्त कफ प्रधान राशीतील सर्वाष्टक बिंदूंची बेरीज करावी आणि त्यानुसार जातकाच्या प्र कृति बद्दल निष्कर्ष काढावा .

विवाह आणि भागीदारीतील व्यवसाय या बाबतीत लग्न व सप्तम स्थान ह्य मधील सर्वाष्टक बिंदू विचारात घ्यावे .ज्या स्थानात बिंदू जास्त असतील त्या व्यक्तीचे वर्चस्व राहील .लग्न आणि सप्तम स्थान किंवा जातक आणि त्याच्या जोडीदाराच्या पत्रीकेत लग्न आणि सप्तम स्थ्नांतील गुणात ६ ते ७ पेक्षा जास्ती अंतर नसावे , ते असल्यास दोघांपैकी एक सतत दुसर्याच्या द्बावाखालील असेल त्यांचे मनोमिलन होण्यास असंख्य अडचणी  येतील .

पती आणि पत्नी च्या चंद्र राशी २८ पेक्षा अधिक गुण असल्यास उत्तम .

ग्रहाचे गोचर कुठल्या स्थानातून, राशी तुन होत आहे ते बघावे. दशा, महादशा, अंतर्दशा, सूक्ष्म दशा कुठली आहे ते चेक करावे. व त्या ग्रहाने किती बिंदू दिले ते पाहावे व त्यावरून आपण फलादेश करू शकतो.

अशा प्रकारे आपण वैदिक ज्योतिष शास्त्र व अष्टक वर्ग या प्रमाणे फलादेश करू शकतो.